5 लाखापर्यंत उपचार मोफत! गरीबांना मोठी मदत, लगेच अर्ज करा | Ayushman Bharat Yojana Maharashtra

Ayushman Bharat Yojana Maharashtra: नमस्कार मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये आपण आयुष्यमान भारत योजना बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. केंद्र सरकार द्वारे सुरू करण्यात आलेल्या या अभिनव अशा योजनेचा फायदा हा आता सर्व गरीब मध्यमवर्गीय कुटुंबांना होणार आहे. या योजनेमुळे गरीबांना मोठा हातभार लागणार आहे, सोबतच सरकार द्वारे आर्थिक फायदा देखील होणार आहे.

आयुष्यमान भारत योजने अंतर्गत कोणते लाभ मिळणार? कोणती व्यक्ती या योजनेसाठी पात्र असणार? अर्ज कसा करायचा? अशी सर्व माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.

जर तुम्हाला पण या अभिनव अशा योजनेचा लाभ घ्यायचा असेल, आणि कुटुंबाला मोठा हातभार लावायचा असेल तर ही महत्वाची अशी माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यांनतर आर्टिकल मध्ये दिलेल्या माहिती नुसार ऑनलाईन आयुष्मान भारत कार्ड काढून घ्या.

Ayushman Bharat Yojana Maharashtra

योजनेचे नावAyushman Bharat Yojana
सुरुवातकेंद्र सरकार
उद्देशगरीबांना मोफत उपचार मिळवून देणे.
लाभप्रत्येक कुटुंबाला 5 लाखा पर्यंत मोफत उपचार
लाभार्थीभारताचे सर्व गरीब मध्यमवर्गीय नागरिक
अर्ज पद्धतीऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळpmjay.gov.in

Ayushman Bharat Yojana Qualification Details (पात्रता निकष)

आयुष्यमान भारत योजनेसाठी केंद्र सरकार द्वारे काही पात्रता निकष ठरवले आहेत, त्यानुसार या पात्रता निकषांचे जे व्यक्ती पालन करतील त्यांना आयुष्यमान भारत कार्ड योजनेद्वारे उपचाराचा लाभ भेटणार आहे.

आयुष्मान भारत योजना ही मुख्यतः गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार ज्या लोकांकडे उपचार घेण्यासाठी पुरेसे पैसे नसतात अशा व्यक्तींना सरकारद्वारे आर्थिक मदत केली जाणार आहे.

आयुष्यमान भारत योजनेसाठी अनुसूचित जाती, जमाती गरीब, मध्यमवर्गीय, आदिवासी, SC, ST, OBC, बेघर, निराधार, भिक्षा मागणारी व्यक्ती, मजूर, शेतकरी आणि दारिद्र्य रेषेखालील सर्व व्यक्ती पात्र असणार आहेत.

वर सांगितल्याप्रमाणे सर्व गरीब लोक या आयुष्यमान भारत योजनेसाठी पात्र असणार आहेत, तसेच यासर्व पात्र लाभार्थ्यांना ऑनलाईन स्वरूपात आयुष्यमान भारत योजनेसाठी अर्ज देखील करता येणार आहे.

Ayushman Bharat Yojana Benifits (लाभ, फायदे)

आयुष्यमान भारत योजनेद्वारे केंद्र सरकार द्वारे वेगवेगळे लाभ आणि फायदे गरिबांना दिले जातात. त्यामध्ये वर सांगितल्याप्रमाणे पाच लाखापर्यंत मोफत उपचार अर्जदारांना मिळतो.

कोणताही आजार असेल तर त्या आजराचा मोफत उपचार केला जाणार आहे, जर आजारासाठी पाच लाखापेक्षा जास्त रक्कम लागत असेल तर तुम्हाला पाच लाखापर्यंतचे रक्कम माफ केली जाईल, आणि तुम्हाला केवळ पाच लाखाच्या उर्वरित रक्कम भरावी लागेल. म्हणजे यामुळे नक्कीच सर्व आजारासाठी लाभ मिळणार आहे.

आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 1350 पेक्षा जास्त आजार येतात, त्या सर्वांसाठी ही योजना लागू असणार आहे. तसेच ज्या व्यक्तीने आयुष्यमान भारत योजनेसाठी कार्ड काढले आहे, त्या व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तींना पण पाच लाखापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे.

परंतु हा लाभ प्रतिवर्षी पाच लाख याप्रमाणे असणार आहे, तसेच एका कुटुंबासाठी पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण असणार आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी देखील या आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेता येतो.

Ayushman Bharat Yojana Document List (आवश्यक कागदपत्रे)

आयुष्मान भारत योजनेसाठी अर्ज सादर करताना अर्जदारांना आवश्यक असे सर्व कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे. जर कागदपत्रे सादर केले नाही तर आयुष्यमान भारत योजना साठी अर्ज करता येणार नाही. त्यामुळे आयुष्यमान भारत कार्ड काढताना लागणारे सर्व कागदपत्रे सोबत ठेवा, म्हणजे तुम्हाला योजनेचा फॉर्म भरणे सोपे जाईल.

आयुष्यमान भारत योजना साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे:

व्यक्तीला त्याचे ओळखपत्र सोबत ठेवावे लागेल, ओळखपत्र मध्ये तुम्ही तुमचे आधार कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, सरकारी ओळखपत्र दाखवू शकता.

Live Photo आयुष्मान भारत कार्ड काढताना ज्या व्यक्तीची कार्ड काढले जात आहे त्याचा Live Photo Capture करावा लागतो, तसेच तो फोटो अपलोड देखील करणे आवश्यक आहे.

आयुष्मान भारत योजना कार्ड काढण्यासाठी केवळ दोनच कागदपत्रे लागतात, ते म्हणजे व्यक्तीचे ओळखपत्र आणि फोटो. सोबत जर फॉर्म मध्ये इतर काही माहिती विचारली तर ती माहिती तुम्हाला भरायची आहे. त्यामुळे इतर कागदपत्र देखील सोबत ठेवा.

Ayushman Bharat Yojana Apply ऑनलाईन स्वरूपात अर्ज कसा करावा?

आयुष्यमान भारत योजनेसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करता येतो, अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. लाभार्थी व्यक्ती स्वतःच्या मोबाईलवरून देखील आयुष्यमान भारत कार्ड काढू शकतो. एकदा आयुष्यमान भारत कार्ड काढले की त्यानंतर, तुम्ही सरकारशी संलग्न असणाऱ्या कोणत्याही दवाखान्यात जाऊन पाच लाख रुपयांपर्यंतचा उपचार मोफत घेऊ शकता.

सुरुवातीला तुम्हाला Play Store वरून Ayushman App Download करून घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्ही Search करू शकता.

आयुष्यमान भारत योजनेचा App Open झाल्यावर तुम्हाला होम पेज वर दोन पर्याय दिसतील त्यातील Beneficiary हा पर्याय निवडायचा आहे.

ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्यानंतर मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून व्हेरिफाय करून घ्यायचे आहे.

त्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या कुटुंबातील सर्वांचे नावे येतील, जर येत नसतील ते तुम्ही तेथे Add पण करू शकता. आता तुम्हाला कार्ड साठी तुमच्या नावा समोरील Apply बटणावर क्लिक करायचे आहे.

पुढे तुमच्या समोर एक फॉर्म उघडेल, तो फॉर्म तुम्हाला काळजीपूर्वक भरून घ्यायचा आहे. सर्व माहिती व्यवस्थित टाकायची आहे, त्यांनतर तुमचे ओळखपत्र तसेच Live Photo Capture करून तो देखील अपलोड करायचा आहे.

सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेवटी आयुष्यमान भारत योजना फॉर्म सबमिट करायचा आहे. जर तुमचे Points जास्त असतील तर तुमचा अर्ज लगेच Approved होईल, एकदा अर्ज Approval झाला की मग तुम्ही तुमचे Ayushman Bharat Card Download करू शकता, आणि 5 लाख रुपयांचा आर्थिक फायदा मिळवू शकता.

Ayushman Bharat Yojana FAQ

आयुष्यमान भारत योजनेसाठी कोण पात्र आहे?

आयुष्यमान भारत योजनेसाठी देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील लोक पात्र असणार आहेत.

आयुष्यमान भारत योजने अंतर्गत कोणता लाभ मिळतो?

आयुष्यमान भारत कार्ड योजनेअंतर्गत अर्जदार लाभार्थ्यांना पाच लाखापर्यंतचा मोफत उपचार मिळतो.

आयुष्यमान भारत योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

आयुष्यमान कार्ड साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करता येतो, नव्हे तर तुम्ही तुमच्या मोबाईल वरून Ayushman App द्वारे काही मिनिटात अर्ज करून आयुष्यमान कार्ड Download करू शकता.

2 thoughts on “5 लाखापर्यंत उपचार मोफत! गरीबांना मोठी मदत, लगेच अर्ज करा | Ayushman Bharat Yojana Maharashtra”

Leave a comment